ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त व्हावा यासाठी केले कचऱ्याच्या रावणाचे दहन
इंदापूर : ज्योतिबा मंदीर परिसर कचरा मुक्त, दुर्गंधीमुक्त व्हावा यासाठी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्र येवून नागरिकांनी रविवारी ( दि.१३) कचऱ्याच्या रावणाचे दहन केले. असंख्य लोकांचे आराध्यदैवत असणा-या ज्योतिबा मंदिराच्या परिसराच्या भिंतीजवळ घनकचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मंदिराचे पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यावर उपाययोजना व्हावी अशी मागणी…
